Thursday, November 11, 2010

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा...............

पाण्याच्या खळाळत्या प्रवाहाप्रमाणे असतो....
एकदा स्पर्श केलेल्या पाण्यास
जसं आपण...
पुन्हा स्पर्श करू शकत नाही
तसंच....
....जीवनात येणारा प्रत्येक क्षण
हा वाहता प्रवाहच आहे....
या क्षणाचं सोनं करायचं असेल....
तर प्रत्येक क्षणाला
समरसून जगायला हवं....
आनंदाच्या लाटांवर
आरूढ होऊन....
आपलं ध्येय गाठायला हवं....
**************************************
आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे

मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत

******************************

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

*************************************

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं, तर एक शहाणं!
वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल!

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं!

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धीराचं फळ त्याला हवं असतं!

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!

सुखाच्या हिंदोळ्यावर



सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचे,
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाहून निघायचे..
काळजी, द्वेष, सारे फेकून ध्यायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

आपले अस्तित्व या दुनियेत पहायचे,
आपले महत्व कुठे आहे का, हे सतत शोधायचे,
आपल्या प्रिय जनाना नेहमीच जपायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

आपले सारे कही क्षणात दुसरयाला ध्यायचे,
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचे,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचे,
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघून जायचे...

पण? पण मला अजुन बरेच काही पाहायचेय...
या दुनियेकडून खुप काही शिकायचेय....
इथे, मलाही काही तरी बनायचेय....
म्हणून मला अजुन,..भरपूर जगायचेय,...भरपूर जगायचेय....
आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहायचेय....!!